नव्या काळाच्या पाऊलखुणा नोंदवण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे डॉ.रणधीर शिंदे
दयानंदमध्ये सोलापूर जिल्हा साहित्य संमेलनाचा समारोप महाकवी डॉ. द.रा. बेंद्रे साहित्य नगरीतून सोलापूर दिनांक १८ ''एकविसाव्या शतकाची स्थित्यंतरे ओळखून नव्या काळाच्या पाऊलखुणा नोंदवण्यासाठी हे संमेलन मला महत्त्वाचे वाटते. नव्या लेखक नव्या दमाच्या लेखकांनी या दोन दिवसीय सत्रामध्ये हजेरी लावली आणि आपला लेखन प्रवास मांडला. नव्या काळात आपल्या भोवताली उभारणारे प्रश्न त्या प्रश्नांना कसे सामोरे जावे असे विषय यापुढे आपल्या साहित्यातून येतील असा विश्वास वाटतो.'' असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रणधीर शिंदे यांनी समारोप सत्रात केले. व्यासपीठावर सोलापूर विद्यापीठाचे प्रो. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, स्वागताध्यक्ष डॉ.विजयकुमार उबाळे, प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर, प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा, समन्वयक डॉ.राजशेखर शिंदे सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे, प्राचार्या डॉ. एस. जे. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या दिवसातील क्षणचित्रे ( चौकट ) कथाक...